HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसैनिकांना जिथे त्यांच्या जागा सुटल्या असतील, त्यांची मी माफी मागतो!

मुंबई। विधानसभा निवडणुकीत “मी तमाम महाराष्ट्रातल्या सैनिकांना जिथे जिथे त्यांच्या जागा सुटल्या असतील त्यांची मी माफी मागतो” अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराज सैनिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण एक लक्षात घ्या तुमची ताकद कधीही कुठेही कमी होता कामा नये,असे म्हणत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना आवाहन केले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “”प्रत्येक गावातील, प्रत्येक खेड्यातील प्रत्येक घरामध्ये शिवसेना आणि शिवसैनिक हा असलाच पाहिजे.”. तुमच्या सारखे शिवसैनिक मिळायला भाग्य लागते. “हे सगळे तुम्ही माझे साथी सोबती आहात, हे असे सैनिक मिळायला सुद्धा भाग्य लागते. केवळ मी माँ आणि बाळासाहेबांचा पुत्र आहे म्हणून हे भाग्य मला लाभले आहे.”असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

निवडणुकीत अत्यंत प्रामाणिकपणाने युतीचे काम करायचे आणि विधानसभेवर आपल्या युतीचा भगवा फडकवायचा, हा भगवा आपल्या शिवरायांचा भगवा आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी युती केली आहे. वादळ आले की सगळा पालापाचोळा उडून जातो, असे म्हणतात. मला भगवे वादळ काय असते हे दाखवून द्यायचे आहे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केले.उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात विरोधकांवरही तोफ डागली. शिवसेनेचा वचननामा अजून जाहीर झाला नाही, मात्र आपल्या भाषणातून शेतकरी, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि सर्वसामन्य जनतेसाठी काही घोषणा उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मद्यविक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत भर घालण्यात पुण्याचा मोठा हातभार

News Desk

समाज हादरुन गेलाय’, चंद्रकांत पाटलांची कठोर शिक्षेची मागणी!

News Desk

मुंबईसह कोकण ते उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज!

News Desk