HW News Marathi
महाराष्ट्र

Bhima Koregaon | भिमा कोरेगाव हिंसाचारातील पाचही आरोपींच्या नजरकैद वाढ, मुख्यमंत्र्यांनी केले निर्णयाचे स्वागत

नवी दिल्ली । ‘अर्बन नक्सल’चा आरोप असलेल्या आणि एल्गार परिषद घेऊन भीमा कोरेगाव हिंसाचार चिथावणी दिल्याच्या आरोपावरुन नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या पाच ही विचारवंताच्या नजरकैदेत आणखी चार आठवड्यांची वाढ करण्यात आली आहे. ही अटक राजकीय हेतूने प्रेरित नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

तसेच या आरोपींनी यासंपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे अशी मागणी न्यायालयाकडे फेटाळून लावली आहे. या आरोपींना न्यायालयाने फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुमची चौकशी कुणी करायच, हे आरोपी ठरवू शकत नाहीत, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले. तसेच हे पाचही आरोपी कनिष्ठ न्यायालयात दाद मागू शकतात, असे देखील निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केले न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

पाच विचारवंतांची नावे

वरवरा राव, अरुण फरेरा, वर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा अशी या पाच विचारवंताची नावे आहेत. ऑगस्ट महिन्याच्या २८ तारखेपासून त्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीस खंडपीठाने २० सप्टेंबरला दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखीव ठेवला होता. खंडपीठामध्ये न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांचा समावेश आहे.

पुणे पोलिसांवर टीका

पोलिसांनी या पाचही विचारवंताना शहरी नक्षलवादाला खतपाणी घालण्याच्या संशयावरुन त्यांना अटक करण्यात आली होती.

या विचारवंतावर झालेली कारवाई ही अधिकाराचा गैरवापर करत झाल्या आरोप विरोधकांनी केली होता. या पाच विचारवंतांच्या अटके विरोधात रोमिला थापर यांच्यासह चार कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजयाबद्दल विश्वास नाही म्हणुन पंकजांची निवडणूकीतून माघार ,धनंजय मुंडेंचा टोला!

News Desk

महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे मराठी भय्ये माफी मागणार का?

News Desk

मराठी भाषा ही शक्ती आणि भक्तीची भाषा !

swarit