HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! देशात आत्तापर्यंत ८३२४ कोरोनामुक्त

नवी दिल्ली | देशात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा ३१,६१० इतका झाला आहे. तर गेल्या २४ तासात १८२३ नवे कोपोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत आणि ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामूळे कोरोनामूळे देशात मृत्यू झालेल्यांची संख्या आता १०७५ इतकी झाली आहे. तसेच, आनंदाची बाब म्हणजे आतापर्यंत ८३२४ कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले असून आता रुग्ण बरे होण्याचा दर हा २५.१९ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती आज (३० एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

त्याचप्रमाणे कोरोनाच्या रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेगही आता ११ दिवसांवर गेला असून ही भारतासाठी आश्वासक स्थिती आहे, असेही प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी कोरोनाविषयक दैनंदिन पत्रकार परिषदेत केले. देशात कोरोनाग्रस्तांचा मत्यूदर हा ३.२ टक्के असून त्यात ६५ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिलांचा समावेश आहे. वयोमानानुसार पाहिल्यास वय वर्षे ४५ पेक्षा कमी वयोगटात म़ृत्यूची टक्केवारी १४ टक्के, वयवर्षे ४५ ते ६० दरम्यान ३४.८ टक्के, वयवर्षे ६०च्या पुढे ५१.२ टक्के अशी आहे. त्याचप्रमाणे वयवर्षे ६० ते ७५ च्या दरम्यान ४२ टक्के, तर वयवर्षे ७५ त्या पुढे मृत्यूदर हा ९.२ टक्के आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या ७८ टक्के प्रकरणांमध्ये रुग्णांचे वय जास्त होते आणि त्यांना अन्य आजारही होते, हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे अग्रवाल यांनी नमूद केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचं पालकत्व राज्य सरकार स्विकारणार – मुख्यमंत्री

News Desk

महाराष्ट्रातील निर्बंध शिथील होणार नाहीत ! बैठकीत तशी चर्चा नाही- राजेश टोपे

News Desk

आता विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा

News Desk