HW News Marathi
महाराष्ट्र

इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत पीसीपीएनडीटी नोटीशीला दिले उत्तर

अहमदनगर | ‘सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होतो,’ असे वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध किर्तनकार यांनी केले होते. या वादग्रस्त विधानानंतर इंदोरीकरांवर सर्व स्तरातून टीकाला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणी इंदोरीकरांना अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी समितीने नोटीस बजावले होते. इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा दिला आहे. मात्र, महाराजांनी नोटीसीत कोणती भूमिका मांडली आहे हे समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे यावेळी माध्यमांना याचं चित्रिकरण करण्यास देखील मज्जाव करण्यात आला.

या प्रकरणावर इंदोरीकरांनी पत्रक जाहीर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. यानंतर इंदोरीकारांनी नोटीसीवर त्यांचे वकील शिवडीकर हे सेवकांसोबत जिल्हा रुग्णालयात आले होते. पीसीपीएनडीटीच्या नोटिसीला आज (१९ फेब्रुवारी) शेवटचा दिवस होता. मात्र, शिवजयंती निमित्ताने आज शासकीय सुटी असल्यामुळे समितीचे प्रमुख तथा जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालयात नव्हते. यामुळे इंदोरीकरांच्या वकिलांनी अपघात कक्षात असलेल्या अधिकाऱ्यांकडे खुलासा केला. खुलासा मिळाल्याच्या झेरॉक्स प्रतींवर सही, शिक्के घेऊन अ‍ॅड. शिवडीकर हे मागच्या दाराने निघून गेले. याबाबत अधिक माहिती विचारली असता शिवडीकर आणि डॉक्टरांनीही माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

महाराज इंदुरीकर महाराज नेमके काय म्हणाले?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून आता लोकलच्या फेऱ्या ५०० पर्यंत वाढवणार

News Desk

‘देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडले’, भाई जगताप यांची टीका

News Desk

“ताज महाल आणि ज्ञानवापी मशिदीखाली शिवलिंग शोधून वाद निर्माण करताय,” राऊतांचा केंद्र सरकारवर आरोप

Aprna