HW News Marathi
महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा, २० ऑगस्टला पुन्हा हजर राहावे लागणार

संगमनेर | आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांना कोर्टाने तुर्तास दिलासा दिला आहे. संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेल्या आदेशाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांना संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी आज सकाळी सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नसणार आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाला २० ऑगस्टला सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे

नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले ?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांचा भाऊ कप्तान मलिकांना ED ने बजावला समन्स

Aprna

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती !

News Desk

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर शरद पवारांचा हात, त्यामुळेच ते मुख्यमंत्री – अमोल कोल्हे

News Desk