HW News Marathi
महाराष्ट्र

चौकशी अधिकारी छळ करत आहेत ! रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात धाव

मुंबई । वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या समन्स प्रकरणी चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोपही यावेळी शुक्ला यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, चौकशीकरिता दिलेल्या समन्सला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी २९ एप्रिल रोजी दाखल केली आहे.

रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ६ मे रोजी हैद्राबाद उच्च न्यायालयात सुनवाणी होणार आहे. रश्मी शुक्ला यांनी आपल्या याचिकेत चौकशी अधिकारी आपला छळ करत असल्याचा आरोप केला आहे. या याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांच्यावर रश्मी शुक्ला यांनी हे आरोप केले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचे आरोप केल्या प्रकरणी सीबीआय रश्मी शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर SID मध्ये कार्यरत असताना बेकायदेशीरपणे काही मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचे आरोप आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास रश्मी शुक्ला यांना समन्समध्ये सांगण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मॉब लिंचिंग’ सारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र !

News Desk

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दिलासा नाहीच!

News Desk

युतीसाठी मनसे उत्सुक, भाजप मात्र,…

News Desk