HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेच्या शपथविधीसाठी राज्यभरातील ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण

मुंबई | राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील शिवाजी पार्कावर शपथ घेणार आहेत. महाविकासआघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालच सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. उद्या ( २८ नोव्हेंबर) शिवतीर्थावर सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उद्धव ठाकरेंना राज्यपाल मुख्यमंत्रिपदाची शपथ देणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील जवळपास ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण दिले आहे. तसेच राज्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी शेतकऱ्यांसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि आमदार एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, या शपथविधीसाठी विविध राज्यांमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले आहे. तसेच द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

तसेत शपथविधीच्या सोहळ्यासाठी निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही उद्धव ठाकरेंनी अद्याप निमंत्रण पाठविले नाही. त्यामुळे राज ठाकरे सहकुटुंब या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती यावर प्रश्न चिन्ही उपस्थिती होते. त्याचसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी म्हणून रॅपिड एक्शन फोर्स, बॉम्बशोधक नाशक पथक, श्वान पथक आदिसह ४ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसे आणि फडणवीसांमध्येही बोलणं झालं, रक्षा खडसेंनी दिली माहिती

News Desk

रासायनिक अमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या सील करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे घ्या

News Desk

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार! – हसन मुश्रीफ

Aprna