HW News Marathi
महाराष्ट्र

स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही! – दिलीप वळसे-पाटील

मुंबई | “आरोप करणे सोपे असते आणि मग स्वतःवर आरोप झाले की, सामोरे जायचे नाही हे शूरपणाचे लक्षण नाही,” असा जोरदार टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांना लगावला. आज जनता दरबारात आले असता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. 

किरीट सोमय्या सध्या नॉटरिचेबल आहेत याबाबत पत्रकारांनी विचारले असता तुमचे झेड सिक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत, असे केंद्राला विचारू असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. सदावर्ते प्रकरणाविषयी रितसर चौकशी सुरू आहे. जी माहिती पोलिसांना मिळत आहे ती माहिती न्यायालयात देत आहेत त्यामुळे चौकशीचा भाग काय आहे आणि नाही यापेक्षा हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना उघड करणं योग्य नाही, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

सिल्व्हर ओक हल्ल्याबाबत ४ एप्रिलला गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळवले होते तरीसुद्धा दुर्लक्ष झाले. जास्तीचा बंदोबस्त ठेवायला हवा होता तेवढा ठेवला गेला नाही त्यामुळे संबंधित डीसीपीची बदली करण्यात आली आहे तर गावदेवी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाला निलंबित केलेले आहे. अधिक चौकशी सुरू आहे. चौकशीत जे जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई करु असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बांधकाम कामगारांना ठाकरे सरकारने दिले आर्थिक पाठबळ

News Desk

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, प्रताप सरनाईकांच्या पत्रावर मनसेचं सूचक ट्विट

News Desk

“मी असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे”- उदयनराजे भोसले

News Desk