HW News Marathi
Covid-19

कोरोनाचे संकट पाहता विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून सुरू होणार

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन जवळपास महिनाभर लांबणीवर गेले आहे. येत्या ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थितीचा पाहाता, पावसाळी अधिवेशन २२ जूनला घेणे शक्य नाही, असे विधीमंडळ कामकाज सल्लागार समिनीच्या बैठकीत ठरले. यामुळे राज्याचे पावसाळी अधिवेशन हे आता ३ ऑगस्टला होणार असल्याचे ठरले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज (१० जून) पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच हळूहळू यात शिथीलता आणली जाईल. जगभरात कोरोनासोबत जगायला शिका, असे म्हटले जाते, तसेच आपल्याला करावे लागेल. बाहेर पडून आरोग्यासाठी व्यायाम करायला सांगितले. पण पहिल्या दिवशीची गर्दी पाहून धाकधूक वाढली. मात्र, बाहेर आरोग्यासाठी पडायचे आहे, खराब करण्यासाठी नाही. जर अशाचप्रकारे गर्दी होत राहिली तर निर्बंध लावावे लागतील, पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. मात्र, तशी वेळ येणार नाही, महाराष्ट्रातील जनता नियमांचे पालन करा,” असे ते यावेळी म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळे तिकडे जाऊन आलो आहोत. नुकसान खूप झाले आहे. विशेषत: रायगड जिल्हा, रत्नागिरीतील दापोली, मंडणगण येथे मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरु आहेतचक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या निकषात बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता लोकल प्रवास आणखी सोपा…

News Desk

“कोरोनाने नागपूरचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केलाय, त्याचे काय ?”, फडणवीस-गडकरींवर काँग्रेसचा हल्लाबोल

News Desk

पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा ! मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk