HW News Marathi
महाराष्ट्र

हिंदू असणे हे पाप आहे का?, गडकरींचा सवाल

नागपूर | “सर्व धर्मियांच्या सन्मान ही भारताची संस्कृती आहे. भारतातील मुस्लिम जेव्हा परदेशात जाता तेव्हा त्यांना हिंदू म्हणूनच ओळखले जाते. मग हिंदू असणे हे पाप आहे का?, असा सवाल केंद्रमंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यालाविरोध करणाऱ्यांना केला आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन होत आहे. यावेळी नागपुरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ आज (२२ डिसेंबर) रॅली काढण्यात आली आहे. यावेळी गडकरींनी हा कायद्या उपस्थितांना समजून सांगताना म्हटले की, “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्व हीच आमची अस्मिता आहे,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.

पाकिस्तानातील हिंदूंची घटती संख्या यावरही गडकरींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. पाकिस्तानमध्ये २२ टक्के हिंदू होते, ते आज केवळ ३ टक्के झाले आहेत. अनेकांचे धर्मांतरण झाले, अत्याचार झाले, असे गडकरी यावेळी म्हणाले. गडकरी पुढे म्हणाले की, सुधारित नागरिकत्व कायदा मुस्लिमविरोधी नसल्याचे स्पष्ट केले. देशातील जनतेमध्ये कायद्याविरोधात मतांच्या राजकारणासाठी भयाचे राजकारण केले जात आहे. मतांसाठी आम्ही जातीपातीचे धर्माचे राजकारण करत नाही, असे देखील गडकरींनी म्हटले आहे. ही भव्य रॅली यशवंत स्टेडियम ते संविधान चौक अशी काढण्यात आली. रॅलीत नितीन गडकरी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या आदीनेत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले

काँग्रेस परदेशी नागरिकांना रेड कार्पेट टाकले | गडकरी

‘आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी कधीच कोणती मशिद तोडली नाही किंवा मुस्लिमांवर अत्याचार होऊ दिला नाही. त्यामुळे देशातील मुस्लिमांना विश्वास देऊ इच्छितो त्यांच्यावर कधीच अत्याचार होणार नाही. काँग्रेसने आजवर केवळ मतांचे राजकारण केले आहे. त्यामुळे त्यांचा आज बँडबाजा वाजला’, असे म्हणत गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. गडकरी पुढे म्हणाले की, “काँग्रेसकडून मतांच्या राजकारणासाठी कायद्याविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत.’ गडकरी म्हणाले की, काँग्रेस परदेशी नागरिकांना रेड कार्पेट टाकले. काँग्रेसच्या षडयंत्रापासून दूर राहा, असा सल्ला त्यांनी जनतेला दिला आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार ?

News Desk

“दत्तक घेतलं म्हणजे रोज महापालिकेत दलाली खायची असं नाही” – फडणवीस

News Desk

इंदापूर तालुक्यात एका महिलेने राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचीच पकडली कॉलर

News Desk