HW News Marathi
महाराष्ट्र

बदल्या करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे –  जितेंद्र आव्हाड

मुंबई | नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यामूळे त्यांच्या चाहत्या वर्गाला धक्का बसला. उपराजधानीतुन थेट त्यांची बदली राज्याच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली. आता त्यांच्या जारी नागपूरचे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी हे पदभार स्वीकारणे आहेत. दरम्यान, त्यांच्या या बदलांनंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. कारण ठाकरे सरकार आल्यापासून बदल्यांचे सत्र हे सुरुच आहे.

दरम्यान, गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी, “बदल्या करणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे”, इतकेच म्हणत सगळ्यांचे तोंड बंद केले आहे. काल (२६ ऑगस्ट) कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, तुकाराम मुंढेच्या बदलीमूळे लोकांमध्ये नाराजी देखील दिसून येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जर महाराष्ट्र सरकारचे पाय खेचायचा प्रयत्न केला तर तुमचा पाय अडकेल’ -संजय राऊत

News Desk

मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, मेट्रोच्या 2A आणि 7च्या चाचणीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा झेंडा

News Desk

राष्ट्रवादी-भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची पंतप्रधानांनी दिली ऑफर; शरद पवारांनी केला खुलासा

Aprna