HW News Marathi
महाराष्ट्र

तर पोलीस महासंचालक नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील, जितेंद्र आव्हाडांची टीका 

मुंबई | बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर रिया चक्रवर्तीची लायकी नसल्याची असभ्य टीका केली होती. त्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पांडेंवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ शेअर करत हा निशाणा साधला आहे. तसेच नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री म्हणून परत आले, तर हे पोलीस महासंचालक नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील, अशी टीका आव्हाड यांनी पांडे यांच्यावर केली आहे.

सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला होता. अभिनेत्री रिया चक्रवर्तीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलाताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची तिची लायकी नाही असेही त्यांनी म्हटले होते.त्यावरून पांडे यांच्यावर टीका होत असून, जितेंद्र आव्हाड यांनीही निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसनेने सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला, श्वेता महालेंची टीका

News Desk

राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा कलम लावलणे चुकीचे, सत्र न्यायालयाने जामीन देताना नोंदवले निरीक्षण

Aprna

हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचं दिसत आहे- देवेंद्र फडणवीस

News Desk