HW News Marathi
Covid-19

केडीएमसीच्या हद्दीत मुंबईमध्ये काम करणाऱ्यांना ८ मेनंतर ‘नो-एन्ट्री’

डोंबिवली। कल्याण-डोंबिवलीमध्ये २२८ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत आज (५ मे) एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, मुंबईत कामानिमित्ताने जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना ८ मेपासून कल्याण डोंबिवली शहरात येण्या-जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे, मुंबईतील सरकारी आणि खासगी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आणि मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या कामाजवळच्या हॉटेलमध्ये मुंबई महापालिका करणार आहे.आयुक्तांनी कल्याण-डोंबिवली शहरातून मुंबईत कामासाठी जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आपली नावं, घराचा पत्ता, ऑफिसचा पत्ता, फोन नंबर, आधारकार्ड याची माहिती महापालिकेकडे देण्याची सूचना केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील, राज्य सरकारचा निर्णय

News Desk

“जिम ओपन करा, बघू काय होतं” – राज ठाकरे

News Desk

राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करावी !

News Desk