HW News Marathi
Covid-19

भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कारखान्यातील परप्रांतीय श्रमिक त्यांच्या घरी निघून गेले आहेत. यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे. यासाठी कामगार ब्युरोची स्थापना करण्यायात आली आहे. कामगारांच्या त्यांच्या कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. त्यानंतर, अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे. उद्योगांना कुशल, अकुशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. मराठी मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री या नात्याने सुभाष देसाई यांनी केले आहे.

गेले महिनाभर परप्रांतीय श्रमिकांना सतत सांगत होतो जाऊ नका. तरीही ते गेले. मात्र, त्यांच्या जाण्याने राज्यात आता रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. ती स्थानिक भूमिपुत्रांनी सोडू नये. कारण, त्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली. महाराष्ट्राला ही एक संधी मिळाली आहे. त्यामुळे आता उद्योजकांनी स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम संधी द्यावी. यामुळे मराठी माणसांची महाराष्ट्रातील बेकारी कमी होईल’, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील कामगारांची अकुशल, अंशत कुशल आणि पूर्ण कुशल कामगारांची नोंदणी करुन उद्योगांच्या गरजेप्रमाणे कामगार पुरवण्याची जाबाबदारी राज्य सरकार घेणार आहे. राज्याच्या उद्योग विभाग, कामगार विघाग आणि कौशल्य विकास विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून येत्या ८ दिवसांत ही नोदंणी होऊल असे सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

श्रमिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत आपापल्या राज्यांत पोहोचवले जात आहे

News Desk

‘पुण्याच्या महापौरांचा मान पहिला, अशी चूक पुन्हा होणार नाही’, अजित पवारांचं विधान

News Desk

पुण्यात नवी नियमावली जारी ! संध्याकाळी ५ वाजल्यानंतर लागू होणार संचारबंदी

News Desk