HW News Marathi
महाराष्ट्र

ज्या लोकांनी कंगनाची बाजू घेतली त्यांचे तोंड काळे करुन कंगना गेली – प्रताप सरनाईक 

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचे म्हणत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या गंभीर वक्तव्यानंतर राज्यासह मुंबईत हा वाद रंगला होता. कंगना आणि शिवसेना यांच्यामधील वाद टोकाला पोहोचला. दरम्यान, कंगना आज (१४ सप्टेंबर) मुंबईहून मनालीकडे रवाना झाली आहे. मात्र, तिच्या या भूमिकेवर शिवसैनिकांनी खोटक शब्दांत टिका केली आहे. तसेच, या टीकेतून भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत ज्या लोकांनी कंगनाची बाजू घेतली त्यांची तोंडे काळे करून ती गेली असे म्हटले आहे.

 

‘ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली. आता मारा बोंबा… असे ट्विटमध्ये प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.तसेच, कंगनाने आज मुंबई सोडून जाताना आणखी एक ट्विट केले होते. त्यात लिहिले होते की, जड अंतकरणाने मी मुंबईतून जात आहे. ज्या रितीने माझ्यावर इतके दिवस हल्ले झाले. शिविगाळ केली, माझ्या कार्यालयानंतर आता घर तोडण्याचा प्रयत्न केला. माझ्या चोहोबाजुने हत्यारबंद सुरक्षा यामुळे माझं पीओकेबद्दल बोलणं योग्य होतं, असा उल्लेख तिने पुन्हा एकदा केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ऑक्सिजनची कमतरता नव्हती’, तर संवेदनशीलता आणि खरेपणाची मोठी कमतरता, राहुल गांधींचा केंद्रावर आरोप!

News Desk

शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका

Adil

भास्कर जाधवांनी पंतप्रधानांची नक्कल केल्यानंतर बिनशर्त मागितली माफी; जाणून घ्या नेमके घडले?

Aprna