HW News Marathi
महाराष्ट्र

“मदती ऐवजी नुसतं राजकारण जमतं”, भाजपचा महाविकासआघाडीवर निशाणा

मुंबई | विरोधी पक्ष हे महाविकासआघाडीवर कायमच टीका करते. गेल्या काही दिवसांपासून नेते मंडळी पूरग्रस्तांना भेट देत आहेत. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता पूरग्रस्तांना मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य मुद्दा, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

राजकारण करणं हाच मुख्य उद्देश

केशव उपाध्ये यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली आहे. केंद्राकडून मदत कशी मिळवता येईल, यासाठी दौऱ्यावर येत राज्यपालांनी चांगली भूमिका घेतली होती. कॅाग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सुनिल प्रभु आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, भाजपच्या वतीने केवळ आशिष शेलार उपस्थित राहिले. अन्य पक्षांचे नेते का आले नाहीत, हा त्यांचा विषय आहे. मात्र, त्यावरून राजकारण करायचे. राज्यपालांवर टीका करायची हे ढोंगीपणाचे आहे.

राजकारण करता कामा नये

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज(२७ जुलै) पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी केंद्राने पुढाकार घ्यायला हवा. अधिकाधिक मदत केली पाहिजे. आणि मग राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी भूमिका घेऊन पूरग्रस्तांचे दुःख पुसायला पाहणी दौऱ्यावर जात असतील, तर अन्य राजकीय पक्षांनी त्याचे स्वागत करायला हवे होते. मात्र, बोलावून सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते तेथे गेलेच नाही. का गेले नाही, हा त्यांचा मुद्दा आहे. परंतु, यावर राजकारण करता कामा नये, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर

News Desk

पीक विमा योजनेवरून विधानसभेत विरोधक आक्रमक

News Desk

“उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे जेलमध्ये जाणार”, प्रदीप शर्मांवरुन सोमय्यांची टीका

News Desk