HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याने गरीबांना काय पॅकेज दिले सांगता येईल का- उपाध्येंचा थोरातांना सवाल

मुंबई | कोरोनाच्या या संकट काळात केंद्र सरकार राज्य सरकरची मदत करत आहे. मात्र, ‘केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेले पीपीई किट, तसेच आवश्यक वैद्यकीय मदत मोठ्या प्रमाणात मिळत नसल्याचा आरोप राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता. केंद्राने जीएसटीचे १६ हजार ५०० कोटी रुपये द्यावे, तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी २५ हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज द्यावे, या मागणीचाही पुनरुच्चारही थोरात यांनी केला होता.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्याने गरीबांना काय पॅकेज दिले सांगता येईल का? असा सवाल उपाध्ये यांनी ट्विटरवरुन बाळासाहेब थोरात यांना विचारला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट तर आहेच. मात्र, दुसरीकडे राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वारंवार खटके उडताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

News Desk

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपचा चंचू प्रवेश

Aprna

‘कास्टिंग काऊच करणाऱ्यांना अटकेची मागणी’, तर राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ तरुणींचं कौतुक!

News Desk