HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंना मुख्यमंत्री-पंतप्रधान व्हावे वाटेल, नियुक्तींचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच | महाजन

नाशिक | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री-पंतप्रधान व्हावेसे वाटेल. परंतु भाजप कोणत्या पदावर कोणाची नियुक्तीं करावी करावी, हा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जातो. पक्षात अनेक जेष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, असे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अशा शब्दात एकनाथ खडसेंवर टीका केली.

‘विधानसभा निवडणुकीत मी शिवसेनेसोबत युती करण्यास विरोध केला होता. त्यामुळे भाजपला विधानसभेत विजयी मिळाला होता. परंतु भाजपला सत्ता मिळाल्यानंतर ज्येष्ठतेनुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होतो.’ असे वादग्रस्त विधान माजी मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी केले होते.

राजकारणात सर्वांनाच आपण मुख्यमंत्री-पंतप्रधान व्हावेसे वाटते. परंतु भाजप कोणत्याही पदनियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्टींचाच, अशा शब्दात पालक मंत्री आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी खडसेंना टोला लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दहीहंडी उत्सवावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना ‘मनसे’ टोला!

News Desk

बाबा सिद्दीकीची ४६२ कोटी संपत्ती जप्त ईडीची कारवाई

News Desk

‘पाठीत खंजीर खुपसणे’अशी ज्यांची ओळख त्यांनी निष्ठेविषयी बोलू नये !

News Desk
मुंबई

मोनोरेलच्या आगीवर नियंत्रण

News Desk

मुंबई म्हैसूर कॉलनी मोनोेरेल स्टेशनजवळ मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना आग लागली. या दुर्घटनेत मोनोचे दोन्ही डबे जळून खाक झाले आहेत. या घटनेते कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आज पहाटे स्टेशनवर मोनोरेल उभी असताना अचानक आग लागली. आग लागल्यामुळे मोनोरेलची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गुरुवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला तातडीनं याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलानं आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Related posts

आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वायू प्रदूषणासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना लिहिले पत्र; म्हणाले…

Aprna

रेल्वेच्या निषेधार्थ उपोषण

News Desk

डहाणूत ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली

News Desk