HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी लाँग मार्च मोर्चाची मुंबईच्या दिशेने आगेकूच

नाशिक | शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा लाँग मार्च मोर्चा काढला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या लाँग मार्च मोर्चा आज (२१ फेब्रवारी) नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले असून हा लाँग मार्च बुधवारी (२७ फेब्रुवारी) मुंबईत धडकणार आहे.

नदी जोड प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती द्यावी, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देऊ नये, वन हक्कांच्या जमिनींचे दावे निकाली काढावे. सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, आणि हमी भावसह विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या आहे. मुंबई नाका येथून नाशिक ते मुंबई हा लाँग मार्च निघाला आहे.

तसेच शेमुंबईच्या दिशेने निघण्याआधी बुधवारी (२० फेब्रुवारी) रात्री उशिरापर्यंत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी किसान सभेच्या पदाधिकार्‍यांसोबत तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. या चर्चेतून लाँग मार्च रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघणारच असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले आहे. मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी, बारावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत काम करणाऱ्या कंपन्यासह संस्था कौतुकास पात्र! – मुख्यमंत्री

Aprna

सचिन वाझेंना लक्ष्य केलं जातंय – संजय राऊत

News Desk

जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही तोपर्यंत मनसेशी युती शक्य नाही!

News Desk