HW News Marathi
देश / विदेश

जाणून घ्या… देशभरातील कोणकोणत्या राज्यात किती रुग्ण ‘कोरोना’मुक्त

नवी दिल्ली | कोरोनाचे संकट देशभरात वेगाने पसरत आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा १००० पार गेला आहेत तर राज्यात २०० वर गेला आहे. तसेत देशा २९ जणांता कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजुला देशभरातील १०० कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांचा कोरोनाची तपासणी नेगेटिव्ही आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील आतापर्यंत २५ जण कोरोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र २५, केरळ १९, उत्तर प्रदेश ११, हरियाणा १७, कर्नाटक ५, दिल्ली ६, तमिळनाडू ४, लडाख ३, राजस्थान ३ हिमचाल प्रदेश २, उत्तराखंड २, तेलंगणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक-एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले असून महाराष्ट्रात मृत्यू झालेल्यांची संख्या ८ आहे. गुजरातमध्ये पाच, कर्नाटकात तीन, मध्यप्रदेश आणि दिल्ली, जम्मू-काश्मीर प्रत्येकी दोन मृत्यू झाले आहेत. केरळ, तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोनामुळे २९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, उधाण

News Desk

अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत लष्करातील मेजर आणि जवान जखमी

News Desk

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

Aprna