HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीचा सरकारी घोळ 

एकाच अधार कार्डवर अनेक शेतकऱ्यांची नावे

मुंबई – कर्जमाफीचा सरकारने इव्हेंट करत स्वताची पाठ थोपटून घेतली होती. मात्र तेच सरकार आता या सरकारी घोळामुळे तोंडघशी पडले आहे. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसै जमा होण्याआधीच सरकारने मोठ्या उत्साहात कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप केले. ही कर्जमाफी म्हणजे दिवाळी भेट असल्याचेही आवर्जून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे तोंडघशी पडलेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

सरकारने शेतकऱ्यांकडून कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत, शेतात सुरू असलेली हातातली कामे टाकून, रांगा लाऊन हे अर्ज भरून दिले. मात्र आता ऑनलाईन आलेल्या अर्जां पैकी ३० ते ३५ टक्के माहितीही चुकीची असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे एकाच आधार नंबरवर एका पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे असल्याची यादी समोर आली आहे. बँकांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष माहिती याचा ताळमेळच बसत नाही. शेतकऱ्यांच्या नावे असलेले कर्ज आणि त्यावरील व्याज या माहितीत मोठी तफावत आहे. दरम्यान, बँकांनी जी माहिती दिली ती आम्ही भरली असल्याचा दावा आयटी विभागाने केला आहे. हा प्रकार समजताच सरकार खडबडून जागे झाले. मुख्यमंत्र्यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत आज तातडीने बँकिंग समितीची बैठक बोलवली आहे. दिवाळी गेली तरी दिवाळी भेट असणारी कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्वतःला जे शेतकरी म्हणून घेत आहेत अशा या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देतायत – कंगना राणावत   

News Desk

राष्ट्रपती निवडणूक – २०२२ साठी जय्यत तयारी; निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक

Aprna

तडीपार गुंडाचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल

News Desk
शिक्षण

बारावीचा निकाल जाहीर, राज्यात मुलींची बाजी

News Desk

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर बुधवारी जाहीर झाला आहे. एचएससी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेत बारावीचा निकाल जाहीर केला आहे.

बारावीचा निकाल खालील प्रमाणे

  • राज्यात ८८.४१ टक्के
  1. – एकूण विद्यार्थी नोंदणी 1418645
  2. – एकूण विद्यार्थी बसलेली संख्या 1416986 पैकी 1252817 उत्तीर्ण
  3. – कोकण विभाग सर्वाधिक निकाल 94.85 %
  4. – नाशिक विभाग सर्वात कमी निकाल 86.78 %
  5. – गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.9 टक्केने निकालात घट
  6. – मुलीची उत्तीर्ण टक्केवारी – 92.36
  7. – मुलाची उत्तीर्ण टक्केवारी 85.23
  • विभागनिहाय निकाल टक्केवारी
  1. पुणे — 89.58%
  2. नागपूर —87.57%
  3. औरंगाबाद — 88.74%
  4. मुंबई — 87.44
  5. कोल्हापूर — 91.00%
  6. अमरावती — 88.08%
  7. नाशिक — 86.13 %
  8. लातूर — 88.31 %
  9. कोकण — 94.41 %
  10. एकूण — 88.41 %

    विद्यार्थ्यांना निकाल बुधवारी दुपारी 1 वा बोर्डाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

Related posts

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सिध्दांत आणि व्यवहार’ विषयावर चर्चासत्र

News Desk

सर्जनशील मोफत कार्यशाळा

News Desk

सचिन साबू यांना अमेरिकेतील सर्वोच्च बहुमानाचा सन्मान

News Desk