HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीचा सरकारी घोळ 

एकाच अधार कार्डवर अनेक शेतकऱ्यांची नावे

मुंबई – कर्जमाफीचा सरकारने इव्हेंट करत स्वताची पाठ थोपटून घेतली होती. मात्र तेच सरकार आता या सरकारी घोळामुळे तोंडघशी पडले आहे. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसै जमा होण्याआधीच सरकारने मोठ्या उत्साहात कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप केले. ही कर्जमाफी म्हणजे दिवाळी भेट असल्याचेही आवर्जून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे तोंडघशी पडलेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

सरकारने शेतकऱ्यांकडून कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत, शेतात सुरू असलेली हातातली कामे टाकून, रांगा लाऊन हे अर्ज भरून दिले. मात्र आता ऑनलाईन आलेल्या अर्जां पैकी ३० ते ३५ टक्के माहितीही चुकीची असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे एकाच आधार नंबरवर एका पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे असल्याची यादी समोर आली आहे. बँकांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष माहिती याचा ताळमेळच बसत नाही. शेतकऱ्यांच्या नावे असलेले कर्ज आणि त्यावरील व्याज या माहितीत मोठी तफावत आहे. दरम्यान, बँकांनी जी माहिती दिली ती आम्ही भरली असल्याचा दावा आयटी विभागाने केला आहे. हा प्रकार समजताच सरकार खडबडून जागे झाले. मुख्यमंत्र्यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत आज तातडीने बँकिंग समितीची बैठक बोलवली आहे. दिवाळी गेली तरी दिवाळी भेट असणारी कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘एमटीपी’च्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय मंडळांची नियुक्ती करावी; डॉ नीलम गोऱ्हेंच्या सूचना

Aprna

…तर कॉंग्रेसला 40 जागाही टिकविता येणार नाही – चंद्रकांत पाटील

News Desk

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस, २९ डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश!

News Desk
Uncategorized

राहुल गांधीं बरोबर हात मिळवणी सर्वांसमोर करेन !

News Desk

अहमदाबाद – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बरोबर हातमिळवणी करायची असेल तर ती सर्वांच्या समोर करेन असे सांगत राहुल गांधी बरोबर गुप्त बैठक झाल्याचे वृत्त पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल याने फेटाळून लावले आहे. एका खाजगी वृत्तवाहीनीने हार्दीक आणि राहुल यांची भेट झाल्याचे वृत्त दाखवले होते. शिवाय राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये हार्दिक आल्याचे सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले होते. त्यानंतर गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली होती.

हार्दीक पटेल यांना पाटीदार समाजाचा मोठा पाठींबा आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्या प्रत्येक हालचालांवर सरकार आणि भाजपच्या नेत्यांचे लक्ष आहे. हार्दिकचा पाठींबा मिळवण्यासाठी काँग्रेससह भाजपचे नेतेही प्रयत्नात आहेत. मात्र हार्दिक आणि त्याच्या सहकार्यांचा कल हा सध्या तरी काँग्रेसकडे असल्याचे स्पष्ट आहे. त्यातूनच राहुल आणि हार्दिकच्या भेटीचे वृत्त समोर आले आहे. शिवाय राहुल गांधी बरोबर हात मिळवणी करायची असेल तर ती सर्वां समोर करेन हे हार्दिक यांचे वक्तव्य सर्व काही सांगून जाते.

Related posts

“मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही”, महेश शिंदेंची धक्काबुक्कीनंतरची पहिली प्रतिक्रिया

Aprna

सेक्स शारिरीक नव्हे मानसिक समस्या…

News Desk

राष्ट्रपती राजवट लावली तरी भाजपचं सरकार येणार नाही ,आठवलेंचा दावा !

Arati More