HW News Marathi
महाराष्ट्र

कर्णबधिरांच्या मोर्चावर पोलिसांची आमानुष मारहाण

पुणे | समाजकल्याण आयुक्तालयासमोर राज्यभरातील कर्णबधीर मोर्चावर आज (२५ फेब्रुवारी) पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयापासून ते मुंबईला निघालेल्या कर्णबधीर व्यक्तींनी विधिमंडळ अधिवेशनात त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार होत्या. या मोर्चात सुमारे एक हजार कर्णबधीर सहभागी झाले होते. मंत्र्यालयावर मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणार्‍या कर्णबधिरांवर पोलिसांनी आमनुष लाठीमार केला.

मात्र पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून संतप्त विद्यार्थ्यांनी धरणे मोर्चा सुरू केले आहे. परंतु नेमक्या कुठल्या कारणाने लाठीचार्ज करण्यात आला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. विविध मागण्या वारंवार सरकारकडे मांडूनही पूर्ण होत नसल्याने हा मोर्चा करत असलेल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगावर वर्ण उठले आहेत. विद्यार्थ्यांनी विविध मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुमच्याकडे लायक उमेदवार नाहीत का ? रोहित पवारांची भाजप-सेनेवर टीका

News Desk

भाजपचे नेते पांडेंचा प्रचार करणार का? या आमच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते म्हणून… गृहमंत्र्यांनी पुन्हा फडणवीसांना डिवचले

News Desk

ठाणे स्थानकात फुकट्याकडून तब्बल 57 लाखांची दंडवसुली

News Desk