HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या ‘पुन:श्च हरीओम’, ‘मिशिन बिगिन अगेन’ घोषणामुळे गोंधळ वाढला। देवेंद्र फडणवीस

मुंबई। पुन:श्च हरीओम, मिशिन बिगिन अगेन मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिली. त्यानंतर गरज पडली तर लॉकडाऊन करावा लागेल, असे विधान उद्धव ठाकरेंनी केले. हे सगळे राज्यातील जनतेला गोंधळून टाकणारे असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

फडणवीस हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर दरम्यान, फडणवीस यांनी आज (१२ जून) यांनी पत्रकार परिषदेत निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या केली मदत तुटपुंजी, महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती, लॉकडाऊनचा गोंधळ आणि परीक्षांचा घोळ यावरून महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

निसर्ग चक्रीवादळाचे संकट कोसळून ११ दिवस उलटले गेले तरीही कुणालाही एका नव्या पैशाची मदत मिळालेली नाही. अशा आपत्तीच्या काळात तात्काळ मदत देणे गरजेचे असते. मात्र, ते होताना ही दिसत नाही. सरकारने १० हजार रुपयांची मदत घोषित केली पण ही रक्कम अद्याप पोहचलेली नाही. नुकसान झालेल्या भागात वीज नसल्याने येथे बँकांमधील व्यवहार ठप्प आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मदतीची रक्कम रोख स्वरूपात नुकसानग्रस्तांना द्यायला हवी, अशी मागणी फडणवीस यांनी माध्यांशी बोलताना केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुस्लिम नागरिक ४ विवाह करु शकतात मग… महाराष्ट्र करणी सेनेचा सवाल 

News Desk

कोळसा आयातीचा केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला भाजपच्या मित्रांच्या फायद्यासाठी! – नाना पटोले

News Desk

नोकरीची सूवर्णसंधी! राज्यात १२,५०० पोलिसांची भरती

News Desk