HW News Marathi
Covid-19

राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव !

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घोळ बंद झाले पाहिजे. राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत नाही, शेतकऱ्यांचा शेतमाल, पायी घरी जाणाऱ्या स्थलांतरित मंजुरांना थांबवा आदी विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीत मुद्दे मांडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात महाविकासआघाडीच्या नेत्यांसह विरोधकांची सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती.

राज्यात अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा आभाव असल्याची गोष्टी फडणवीसांनी निदर्शनास आली. फडणवीस माध्यमाशी बोलताना सांगितले, “मुंबईत चीफ सेक्रटरी आणि मुंबई पालिका आयुक्त, पुण्यात पालिका महापौर, कलेक्टर आणि पोलीस आयुक्त, नागपूरमध्ये पालिका आणि पोलीस आयुक्त यांच्यामध्ये सध्याच्या परिस्थिती राज्यात समन्वये दिसत नाही. यावेळी राजकीय नेत्यांनी पुढे येऊन अधिकाऱ्यांमधील समन्वये घडवून आण्याचे काम केले पाहिजे.”

राज्यात लॉकडाऊनमुळे सध्या शेतकऱ्यांसमोर मोठ्या समस्या आहेत. “कापूस, तुरी, मका, चणे, यांची खरेदी होत नाही. राज्य सरकारने पळम महासंघाच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणात सर्वांची खरेदी करावी, असे राज्य सरकारला फडणवीस यांनी सूचविले आहे. फडणवीस पुढे म्हणाले, केंद्र सरकारने काल अधिकची मका आमि ज्वारी खरेदी करण्याकरता परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांचा माल खरेदी केला नाही तर येत्या काळा शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल. शेतकऱ्यांना बिबिणे यांची उपलब्धता ती सरकारने केली पाहिजे,” असेही फडणवीस म्हणाले.

पोलीस आणि आरोग्य कर्मचारी याचे पगार वाढवा

पोलिसांवर कामाचा मोठा ताण आहे. पोलिसांवर हल्ले होत आहेत. आणि पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. पोलिसांच्या सर्व प्रश्नांकडे सरकाने गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे फडणवीस म्हणाले. सध्या राज्यात पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली. मात्र, पोलिसांना सुद्धा रुग्णालयात जागा नाही. पोलीस आणि आरोग्य कर्मचारी याचे पगार वाढवण्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले.

पायी जाणाऱ्या परप्रांतीयांना थांबवा | फडणवीस

आजही राज्यातून स्थलांतरित मंजूर पायी त्यांच्या स्वगृही निघाले आहे. या सर्वांना राज्य सरकारने थांबवण्याची विनंती फडणवीसांनी राज्य सरकारला केली आहे. आता केंद्र सरकारने परप्रांतीय त्यांच्या गावी जाण्यासाठी श्रमिक विषेश ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. आणि मुंबईमधूनही केंद्र सरकार ट्रेन द्याला तयार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने स्थलांतरित मंजुरांना तत्काळ थांबवून त्या सर्वांना ट्रेनने त्यांच्या राज्या पाठवावे, अशी विनंती फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे. यासाठी १-२ दिवस लागले तरी चालेल, त्या सर्वाची व्यवस्था करावी, चालेत तर जाऊ द्या, आपली बला टाळण्यासारखे असे करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लॉकडाउन आवडे सरकारला”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

News Desk

सरकाने जाहीर केलेल्या पॅकेजचे पैसे लोकांपर्यंत थेट का पोहोचवण्यात आले नाहीत?

News Desk

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

News Desk