HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्याच्या भूमिकेविरोधात काँग्रेस नेत्याचं थेट राज्यपालांना पत्र

मुंबई | मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन सध्या राज्याचं राजकारण तापलेलं आहे. या हत्या प्रकरणाची दिल्लीतील निर्भया प्रकरणाशी तुलना करण्यात आली आहे. दरम्यान, मुखमंत्र्यांनी याप्रकरणी परप्रांतियांविरोधात प्रतिक्रिया दिली होती. याचा विरोध करताना मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विश्वबंधू रॉय यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे. अमर उजालाने याबाबत वृत्त दिलं आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या या भूमिकेवर टीका

साकीनाका बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांना जबाबदार धरलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस नेते विश्वबंधू रॉय नाराज झाले आहेत. याविरोधात त्यांनी थेट राज्यपालांना पत्र लिहिलं असून यामध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या या भूमिकेवर टीका केली आहे. रॉय यांनी आपल्या पत्रात म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या प्रदेशाची चिंता आहे. ठाकरे यांनी या प्रकरणी इतर राज्यांतील नागरिकांना जबाबदार धरलं आहे. आपल्या वोट बँकेला संतुष्ट करण्यासाठीच त्यांनी असं विधान केलं आहे.

काँग्रेस नेते विश्वबंधू रॉय यांनी यापूर्वीही शिवसेनेला टार्गेट केले होते. याच वर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून शिवसेनेविरोधात तक्रार केली होती. शिवसेना नेत्यांचं घोटाळ्यांमध्ये नाव येत असल्यानं त्याचा काँग्रेसला धोका असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच सरकारमधील नवा घोटाळा कधीही बाहेर येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करत सरकारमधील ही आघाडी पुढे काँग्रेससाठी धोक्याची ठरु शकते असंही त्यांनी म्हटलं होतं.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा!

News Desk

“बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व ‘येर गबाळे’ पळून गेले ,एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले” – मुख्यमंत्री

News Desk

धान खरेदी केंद्राचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna