HW News Marathi
महाराष्ट्र

“अतिवृष्टीमुळे कोळशाचा पुरवठा आणि उत्पादनात घट”- कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी

नवी दिल्ली | सध्या लोडशेडींगचा विषय राज्यात चिंतेचा विषय ठरला आहे. कोळशाचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे केल्या आहेत. यावर कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिक पाऊस हे यामागचं एक कारण आहे. दुसरे, मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे वाढलेले दर. यामुळे कोळसा आयात महाग झाली आहे, असं कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.

मला कोणतेही आरोप करायचे नाहीत, पण…

राज्यांना लगेचच पैसे द्यावे लागत नाहीत. कोळसा क्रेडिटवर उपलब्ध केला जातो. राज्यांना कोळशाचा रोज होत असलेला पुरवठा सुरू राहील. तसंच पुढील १५-२० दिवसांत साठा वाढण्यास सुरवात होईल. अनेक राज्यांमध्ये कोळसा खाणी आहेत. पण त्यांनी त्याचा वापर केला नाही, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले. मला कोणतेही आरोप करायचे नाहीत. पण आम्ही राज्यांना जानेवारी ते जुलैपर्यंत आमच्याकडून कोळसा घेऊन साठा वाढवण्याची सूचना केली होती. कारण जोरदार पाऊस पडल्यावर अडचणी येऊ शकतात. पण आम्ही केलेल्या सूचनेनुसार राज्यांनी तसे केले नाही.

हा कोळसा मागणीपेक्षा जास्त आहे. २१ ऑक्टोबरपासून २० लाख टनांची मागणी केली गेली आहे. ती मागणी पूर्ण केली जाईल आणि कोळशाचा तेवढा पुरवठा करण्यात येईल, असं ते म्हणाले. एका माध्यमा ने वृत्त दिलं आहे. आयात करण्यात येत असलेल्या कोळशाची किंमत आधी सुमारे ६० डॉलर प्रति टन होती. आता ती वाढून १९० ते २०० डॉलर प्रति टन झाली आहे. आयात केलेल्या कोळशाद्वारे देशातील वीजनिर्मिती केंद्रांद्वारे ३० ते ३५ टक्के वीज उत्पादन केलं जातं. पण सध्या ही वीजनिर्मिती बंद आहे. आम्ही दोन दिवसांसाठी १९ लाख टनांहून अधिक कोळशाचा पुरवठा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, तर परबदेखील निशाण्यावर!

News Desk

चांदिवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांसाठी विकासक निवड प्रक्रियेत गैरप्रकार

Aprna

अन्यथा आम्ही उग्र स्वरूपाच आंदोलन करू, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

News Desk