HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोनाचा धोका वाढला, राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

यवतमाळ | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अखेर यवतमाळ जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या १० दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे.

तसेच शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची शनिवारची सभाही रद्द करण्यात आली आहे. त्यासंबंधी माहिती देणारा व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. रात्री १० नंतर अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरण्यास मनाई राहणार आहे

यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद या तीन ठिकाणी सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढणाऱ्या ३ ठिकाणांहून प्रतिदिन प्रत्येकी ५०० याप्रमाणे दिवसाला १५०० नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिल्ह्यासाठी धक्कादायक, दोन जणांचा रिपोट पॉझिटिव्ह

News Desk

राष्ट्रपतींची पत्नी सविता कोविंद यांनी गरिबांसाठी मास्क शिवत कोरोनाविरुद्धच्या लढाईत घेतला पुढाकार

News Desk

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टातील ‘ती’ याचिका मागे

News Desk