HW News Marathi
Covid-19

देशात ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शहा यांची बैठक

मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज (२९ मे ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. या बैठकीत ३१ मेनंतर देशात दोन आठवड्याच्या लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात ३१ मेनंतर लॉकडाऊन नवीन नियमावली काय असेल, यासंदर्भात बैठकीत चर्चा सुरू असून कुठे लॉकडाऊन शिथील होईल.

अमित शहा यांनी काल (२८ मे) देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत देखील लॉकडाऊन आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली. या बैठकीत अमित शहांनी देशातील लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्याची माहिती मिळाली आहे.

आज कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक

देशात गेल्या २४ तासांत ७ हजार ४६६ नव्या कोरोना रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे. एका दिवसात झालेली विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढली आहे. तर एका दिवसात १७५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर आता देशात १ लाख ६५ हजार ७९९ वर पोहोचली आहे. देशाता आतापर्यंत ७१, १०५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. तसेच देशात ४ हजार ७०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे असून देशात सध्या ८९, ९८७ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात उद्यापासून ‘नाईट कर्फ्यू’, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

जाणून घ्या… महाराष्ट्रात चौथ्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू तर काय बंद?

News Desk

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण   

News Desk