HW News Marathi
देश / विदेश

सरकार स्थिर, आता अनेक जण आमच्याकडे येणार हे स्वाभाविकच !

मुंबई | “राज्यातील आमचे सरकार स्थिर असल्यामुळेच अन्य पक्षातील नेत्यांनी आमच्याकडे येणे स्वाभाविक आहे. अनेक जण सध्या आमच्याकडे येण्यास प्रयत्नशील आहेत. त्यांपैकी काहीजण काँग्रेसमध्ये येऊ शकतात”, असे मोठे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. दरम्यान, निवडणुकांपूर्वी भाजपच्या मेगाभरतीत काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले अनेक जण आता महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. याच पार्श्वभूमीवर, अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“अनेकांना सरकारला काम करू द्यायचे नाही. म्हणूनच काहीही कारण नसताना सरकार अस्थिर असल्याचा प्रचार केला जात आहे. राजस्थानसारखीच राजकीय स्थिती महाराष्ट्रातही निर्माण करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मात्र, आमची एकजूट असल्याने महाराष्ट्रात भाजपचा हा प्रयोग यशस्वी होणार नाही”, असा विश्वास व्यक्त करत महाविकासआघाडीचे आमदार फुटणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

“मराठा आरक्षणावरून सध्या जे काही सुरु आहे तो एका षडयंत्राचा भाग आहे. हे भाजप पुरस्कृत आंदोलन आहे. जे लोक या आंदोलनात सहभागी आहेत त्यांचा बोलवता धनी भाजप आहे. हे आंदोलन म्हणजे मोठा कट आहे. मराठा समजला आरक्षण मिळू नये अशी ईच्छा असणारेच हे उद्योग करत आहेत. राज्य सरकार मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कुठे कमी पडतेय ?”, असा प्रश्नही अशोक चव्हाण यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात

News Desk

सकाळचा नाष्टा गडकरींच्या घरी; एकनाथ खडसे, रक्षा खडसे गडरींच्या भेटीला

News Desk

उत्तरप्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला

News Desk