HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी बस-मालवाहू कंटेनरचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू

धुळे | औरंगाबादहून शहादाकडे येणारी एसटी बस आणि मालवाहू कंटेनरची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात एसटीबस चालक मुकेश पाटील १५ जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी दोंडाईचा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी (१८ ऑगस्ट) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.

यामध्ये एसटी बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे तात्काळ मदत म्हणून १० हजार रुपये तर जखमींना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत देण्यात आले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते निमगुळ रस्त्यावर औरंगाबादकडून शहादाकडे जाणारी एमएच २० बीएल ३७५६ क्रमांकाची बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. पर्यटन मंत्री जयकुमार रावल घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य वेगाने सुरु आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार येता कामा नये

News Desk

‘केंद्राला वाटत असेल की शेतकरी थकेल तर तो गैरसमज’

News Desk

हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस; विधानसभा अध्यक्षाची निवड होणार?

Aprna