HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : मध्यरात्रीपासून देशांतर्गत सीमा बंद, सर्वांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे !

मुंबई | राज्यात कोरोनाच प्रादुर्भव रोखण्यासा आज मध्यरात्रीपासून देशांतर्गत सीमा बंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत अडथळा आणू नका, अशा सूचनाही मुख्ममंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज (२४ मार्च) सोशल मीडियाद्वारे जनतेला संबोधित केले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांवर तुमच्या कंपनीचे नाव बंधनकारक, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी कंपनीना दिल्या आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी समजूदारीपणा दाखविला पाहिजे, लोकांनी सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यात कृषीविषयक वाहतूक सुरू राहिल, असे ते यावेळी म्हणाले. काही लाख मास्क पोलिसांनी जप्त केले, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे. आपल्यावरील संकट गंभीर आहे पण सरकार खंभीर आहे, असा धीरही मुख्यमंत्र्यानी राज्यातील जनतेला दिला.

राज्यात अन्न-धान्याचा, भाजीपाल्याचा साठा पुरेसा असून अन्न-धान्य, भाजीपाल्याचे सुरळीत वितरण करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सर्वांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे असून नागरिकांनी घरात राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केंद्राचे आभार मानले

आमच्या विनंतीनुसार आज रात्रीपासून देशांतर्गत विमान सेवा बंद केली याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. गेल्या आठवड्यातच मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना कर व जीएसटी परतावा तारीख वाढवून देण्याची विनंती केली होती ती त्यांनी मान्य केली आहे त्यासाठी आभार.

मुख्यमंत्र्याच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • आपल्यावरील संकट गंभीर आहे पण सरकार खंभीर आहे
  • कृषीविषयक वाहतूक सुरु राहील
  • काही लाख मास्क पोलिसांनी जप्त केले, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक
  • या संकटाचा कोणीही संधी म्हणून उपयोग करता काम नये
  • वाहनांवर तुमच्या कंपनीचे नाव बंधनकारक
  • जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत अडथळा आणू नका
  • यंत्रणांवर ताण वाढेल असे काही करू नका.
  • राज्यात अन्न-धान्याचा, भाजीपाल्याचा साठा पुरेसा
  • अन्न-धान्य, भाजीपाल्याचे सुरळीत वितरण करण्यासाठी प्रयत्न सुरु
  • मध्यरात्रीपासून देशांतर्गत सीमा बंद
  • सर्वांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे
  • राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद
  • नागरिकांनी घरात राहा, सुरक्षित राहा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शासन निर्णय जारी

Manasi Devkar

दोन्ही विषय पोलिसांच्या अखत्यारीत त्यामुळे त्यावर ‘नो कमेंट’,निरपेक्ष चौकशी व्हावी – जयंत पाटील

News Desk

अखेर नितेश राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश, कणकवलीतून भरला उमेदवारी अर्ज

News Desk