HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांच्या विमान प्रवासावरुन राज्य शासनाने दिले स्पष्टीकरण

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज (११ फेब्रुवारी) उत्तराखंड दौरा होता. मात्र, राज्य सरकारने राज्यपालांना विमानाची परवानगी नाकारली होती. मात्र, आता यावरुन राज्य शासनाने स्पष्टीकरण दिले आहे. राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्या अगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने काय दिले आहे स्पष्टीकरण?

राजभवनाने राज्यपालांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते, असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक 10 फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही.

राजभवनाच्या प्रसिद्धीपत्रकात नेमकं काय म्हटलं आहे?

महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड मसुरी येथे निघाले होते. मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे आयएएस अधिकाऱ्यांच्या १२२ व्या प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगतसिंग कोश्यारी होते. शुक्रवारी 12 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम नियोजित होता.

त्यानुसार राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबईहून गुरुवारी 11 फेब्रुवारी 2021 रोजी देहरादूनसाठी 10 वाजता निघणार होते.

या दौऱ्याच्या निमित्ताने राज्यपालांच्या सचिवालयाने महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना 2 फेब्रुवारी 2021 रोजी, राज्यपालांनी सरकारी विमानाचा वापर करण्यास परवानगी मिळावी म्हणून पत्र पाठवले होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही कळविण्यात आले होते.

त्यानुसार आज, ११ फेब्रुवारीला, राज्यपाल सकाळी १० वाजता मुंबई विमानतळावर पोहोचले आणि सरकारी विमानात चढले. तथापि, माननीय राज्यपालांना सांगण्यात आले की शासकीय विमानाच्या वापरासाठी परवानगी मिळालेली नाही.

त्यानंतर राज्यपालांच्या निर्देशानुसार, मुंबई येथूनच देहरादूनसाठी व्यावसायिक विमानाचं तिकीट तातडीने बूक करण्यात आलं. हे विमान दुपारी 12.15 वाजताचं होतं. त्या विमानाने ते देहरादूनला रवाना झाले.

वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे ३ हजार ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

Manasi Devkar

शिवसेनेला मनसेचा धक्का, खैरेंच्या निष्ठावंत समर्थकांचा मनसेत प्रवेश

News Desk

एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आज हजर राहणार

News Desk