HW News Marathi
Covid-19

काँग्रेसच्या प्रदेशध्यक्षपदी नाना पटोले तर पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष ?

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे राज्यात राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील आता काही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आता नाना पटोले यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना राज्याचे मंत्रिपद आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद अशी दोन्ही पदे एकत्रितपणे सांभाळावी लागत असल्याने त्यांच्यावर मोठा ताण असल्याने हा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

बाळासाहेब थोरात यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नाना पटोले यांच्याकडे सोपविण्यात येऊ शकते अशी चर्चा आहे. त्याचप्रमाणे, नाना पटोले यांच्या जागी म्हणजेच महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत पातळीवर याबाबतचे निर्णय घेण्याचा विचार सुरु असल्याचे म्हटले जात आहे. काहीच दिवसांपूर्वी नाना पटोले हे दिल्लीच्या दौऱ्यावर होते. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ते भेट घेतील, अशीही चर्चा होती. मात्र, काही कारणास्तव ती भेट होऊ न शकल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हे मोठे बदल होणार का ? हे लवकरच येत्या काळात पाहायला मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा

News Desk

औरंगाबादमधील सदोष व्हेंटिलेटरबाबत कोणालाही दोषी ठरवत नाही, प्रकरण सामंजस्याने सोडवावं, केंद्रांचे उत्तर

News Desk

राज्याला मोठा दिलासा ! कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजारांहून कमी, तर कोरोनमुक्त ६० हजारांच्या पार 

News Desk