HW News Marathi
Covid-19

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ, गेल्या २४ तासांत ६९७१ नवे रुग्ण

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. अनेक शहारांमध्ये संचारबंदी तर काही ठिकाणी लॉकडाउनची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. दरम्यान मागील २४ तासांमध्ये राज्यात ६९७१ कोरोनाबाधित रुग्ण वाढले असुन, ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल (२१ फेब्रुवारी) या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, मास्क वापरा लॉकडाउन टाळा, शिस्त पाळा लॉकडाउन टाळा, असं आवाहन केलं आहे.

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २१ लाख ८८४ वर गेली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात २ हजार ४१७ जण करोनातून बरे झाले. तर, एकूण १९ लाख ९४ हजार ९४७ जणांनी करोनामुक्त झालेले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ५२ हजार ९५६ असुन, आजपर्यंत ५२ हजार ९५६ रुग्णांचा राज्यभरात कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ राज्यातून १२०० जणांना झारखंडला नेण्यासाठी पहिली नॉनस्टॉप विशेष ट्रेन रवाना

News Desk

मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत पालिकेकडून सुधारित नियमावली जाहीर

News Desk

राज्यात आज १५,५७५ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk