HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना दिलासा….

मुंबई | राज्यात जुलै २०२१ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापी, अद्यापही केंद्र शासनाने २०१५ नंतर नुकसान भरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम २०१९ सालच्या महापुरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना मागील महिन्यात महापुराचा फटका बसला होता. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसानं कहर केला होता. अनेक भाग पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकारकडून नुकसान भरपाईसाठी पंचनामेही करण्यात आले आहेत. आता राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ सालच्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.

२०१९ साली जशी मदत झाली तशी मदत यावेळी झाली पाहिजे

“२०१९ मध्ये आलेल्या महापूरानं प्रचंड नुकसान झालं होतं. ५ हजार रोखीने १० हजार बॅंक खात्यामध्ये छोट्या दुकानदारांना ५० हजार रुपये, जनावरांच नुकसान असेल तर त्याला २० हजार रुपये तसेच घरांच्या पडझडीसाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला. शेतकरी असेल शेतमजूर असेल किंवा छोटा व्यावसायिक असेल या सर्वांना आपण विनाविलंब मदत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रत्येक भागातून २०१९ साली जशी मदत झाली तशी मदत यावेळी झाली पाहिजे अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ मदत जाहीर केली पाहिजे,” असं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन

News Desk

बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून निर्माण होणारा एकोपा महत्त्वाचा! – सुनील केदार

Aprna

तुम्हीच असे हतबल होऊन आत्मबलिदान दिले तर मला चांगले वाटणार का?

News Desk