HW News Marathi
Covid-19

राज्य सरकारने सव्वा चार लाखांहून अधिक मजुरांना स्वगृही पोहोचवले !

मुंबई | “१९ मे रात्री ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील ४,२६,७७८ मजूरांसाठी ३२० रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ५१, लोकमान्य टिळक टर्मिनसहून ४५, पुण्याहून ३२, बोरिवलीहून २५, वांद्रे टर्मिनसहून २२ व पनवेलहून २१ गाड्या सोडण्यात आल्या आहेत”, अशी अधिकृत माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे या सर्वच स्थलांतरित मजूरांच्या रेल्वे प्रवासाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलत असल्याची माहिती देखील अनिल देशमुख यांनी दिली आहे. एका व्हिडिओद्वारे राज्याच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

“परप्रांतीय कामगारांना त्यांच्या स्वगृही त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मंगळवार रात्रीपर्यंत ३२० रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तर आज दिवसभरात ६० रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. या ३८५ रेल्वे गाड्यांमधून ५ लाखांहून अधिक परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात पोहोचतील”, अशीही माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. “ज्या ज्या कामगारांची नाव प्रवाशांच्या यादीमध्ये असेल त्याचप्रमाणे ज्यांना फोनवरून कळवण्यात येईल केवळ त्यांनीच रेल्वे स्थानकावर जायचे आहे. या सर्व स्थलांतरित कामगारांच्या संपूर्ण प्रवासखर्च राज्य शासन करत आहे”, अशीही माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

पोलिसांवरच ताण कमी करण्यासाठी आता पोलिसांच्या मदतीसाठी मुंबईतील ९३ पोलिस ठाण्यांमध्ये मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यांमध्ये आता मंत्रालयातील ४० वर्षांहून कमी वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजधानी दिल्लीत ३ दिवसांत तब्बल ५ हजार नवे कोरोनाबाधित

News Desk

आज २९३३ नवीन रुग्णांची नोंद, राज्यात ४१ हजार ३९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

News Desk

मुंबईत होणार ऑक्सफर्ड लसीची मानवी चाचणी!

News Desk