HW News Marathi
महाराष्ट्र

देशातील महाराष्ट्र हे राज्य कोरोना चाचण्यांत अव्वल

मुंबई | राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने आज (११ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांतील विविध मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी देशातील महाराष्ट्र असे एकमेव राज्य आहे ज्यात सगळ्यात जास्त कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात वाढवलेल्या या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी काळजी घेण गरजेचे आहे असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच, जर लॉकलाऊनचे नियम पाळले नाही तर लॉकडाऊन वाढवावा लागणार, असे सुचक वक्तव्यही आरोग्यमंत्र्यांनी केले.

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • राज्यात आत्तापर्यंत ३३ हजार चाचाण्या झाल्या.
  • मुंबईत कोरोनाचे ६६ टक्के, पुणे २० टक्के, नवी मुंबई, पालघर, ठाणे यात १० टक्के रुग्ण
  • कोरोना रुग्णांसाठी ३ प्रकारची रुग्णालये असणार.
  • सामान्य, माईल्ड आणि क्रिटीकल
  • ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे नसतील त्यांनी सामान्य रुग्णालयात जावे, ज्यांच्यात माईल्ड लक्षणे असतील त्यांनी माईल्ड रुग्णालयात जावे आणि जे क्रिटीकल आहेत त्यांनी क्रिटीकल रुग्णालयात जावे.
  • कोरोनाशी लढण्यासाठी पुल टेस्टिंगची तयारी.
  • वेळ आणि टेस्टिंग किटची बचत करण्यासाठी निर्णय
  • ग्रीन, ऑरेंज आणि रेड विभाग होणार
  • ग्रीन विभागातील उद्योगधंदे सुरु ठेवण्याचा विचार सुरु.
  • कामगारांना सुरक्षित अंतर ठेवून काम करण्याचा सल्ला.
  • मी थांबणार आणि कोरोनाला हरवणार

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चेहरा भोळा आणि भानगडी सोळा” ठाकरे सरकारवर टीका

News Desk

‘येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी’, गोपीचंद पडळकरांचा विजय वडेट्टीवारांवर हल्ला

News Desk

राजकारण आणि टीका करण्याची वेळ नाही, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

News Desk