HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातही लॉकडाऊन होणार का?

मुंबई | देशात कोरोनाग्रसत्यांची संख्या ३३६ वर पोहोचली असून महाराष्ट्रात ही संख्या ७४ वर पोहोचली आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची संख्या आणि एकंजर परिस्थिती पाहता राजस्थान आणि पंजाब सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील वाढती संख्या पाहता आता महाराष्ट्रही लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेऊ शकतात. गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत दोन रुग्णांचा कोरोनामूळे मृत्यू देखील झाला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो.

मुख्यमंत्र्यांनी विविध खात्यांचे मंत्री आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करायचा असल्यास लोकांशी संपर्क साधणे, गर्दी टाळणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे खूप गरजेचे आहे. भारतात आणि महाराष्ट्रात सध्या कोरोनाची स्टेज २ आहे. मात्र, परिस्थिती पाहता तिसऱ्या टप्प्यातही जाऊ शकतो आणि स्थिती आणखी बिघडू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोचा धोका रोखण्यासाठी कठोर पावले उलणे ही काळाजी गरज आहे त्या दृष्टीने सरकार पावले उचलत आहे. दरम्यान, आजच्या जनता कर्फ्यूला जनता सहकार्य करत आहे आणि यापुढे जर सरकारने कोणताही निर्णय घेतला तर त्यालाही नागरिक असाच प्रतिसाद देतील असा विश्वासही सरकारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

’25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता तर 11 जिल्ह्यांमध्ये नियम कायम’, आरोग्य मंत्र्यांची घोषणा!

News Desk

राज-उद्धव ठरवून आले एकत्र

News Desk

क्राइम ब्रांच यूनिट 11 ची उल्लेखनीय कामगिरी; लक्ष विचलित करून, बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

Aprna