HW News Marathi
Covid-19

विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार मागे घेण्यासाठी महाविकसाघाडीची बैठक

मुंबई | महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपले उमेदवार दिले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाविकासआघाडीने प्रत्येक २ उमेदवार दिले आहे. तर भाजपने चार उमेदवारांची नावे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दिली आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १० उमेदवारी झाल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होण्यावर प्रश्न चिन्ही उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आज (१० मे) सध्याद्री अतिथी गृहावर ही बैठक सूरू असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी काँग्रेसने दिलेल्या दुसरा उमेदवार मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने दोन उमेवार जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेच्या मन वळवण्यासाठी महाविकासाघाडीची बैठक बोलवली असून यात बैठीत महाविकासआघडीचे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तर शिवसेनेकडून शिवसेनेकडून संजय राऊत आणि ठाण्याचे पालमंत्री एकनाथ शिंदे नेते बैठकीला उपस्थित आहे.

विधानपरिषदेच्या सर्व पक्षांच्या उमेदवारांची नावे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल (९ मे) ट्वीट करत राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर केल्याची माहिती दिली. तर भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने ८ मे रोजी चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे नावे ४ मे रोजी निश्चित झाले आहे.

विधानपरिषदेतील असे आहे संख्याबळ

विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २, आणि शिवसेना १ अशा एकूण ९ जागा रिक्त झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणू जिंकून येण्यासाठी २९ मते आवश्यक आहेत. तर महाविकास आघाडीला विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. महाविकासआघाडीने विश्वदर्शक ठरावा वेळी १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. मात्र, भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे एकून ११५ सदस्यांचा पाठिंबा आहेत. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी २ मतांची कमतरता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, आनंद ठाकूर व किरण पावसकर हे तीन सदस्य निवृत्त झाले. तर विधानसभेत निवडून आलेल्या ५४ व अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे दोन्ही नेते सहज जिंकून येतील. तर काँग्रेस ४४ सदस्या असून त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नौदलाची आयएनएस जलाश्व ही युद्धनौका मालदीवमध्ये दाखल

News Desk

अहंकार सोडा, संपूर्ण देशात ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा !

News Desk

पुण्यातील हॉटस्पॉट परिसरात ५१.५% लोकांना होऊन गेला कोरोना

Gauri Tilekar