HW News Marathi
देश / विदेश

देशात मेल, एक्स्प्रेस, लोकल सेवा ३० सप्टेंबरपर्यंत बंदच

नवी दिल्ली | देशात गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. सुरुवातीच्या काही महिन्यांत कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवण्यासाठी देशात कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र आता अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. असे असले तरी आता या अनलॉकच्या काळातही लोकल, मेल आणि एक्स्प्रेस सेवा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता, ३० सप्टेंबरपर्यंत देशातील मेल, एक्स्प्रेस आणि लोकल सेवा बंदच राहणार आहे.

देशातील मेल, एक्स्प्रेस आणि लोकल सेवा बंद ठेवण्याच्या निर्णयाला यापूर्वी ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ती वाढवून आता येत्या ३० सप्टेंबरपर्यंत देशातील मेल, एक्स्प्रेस आणि लोकल बंदच ठेवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, आता आहे त्याप्रमाणेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेली लोकल सेवा ही सुरुच राहणार आहे. त्याचप्रमाणे, या कोरोनाकाळात रेल्वेकडून सोडण्यात येत असलेल्या विशेष लोकल देखील सुरुच राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तृप्ती देसाई लवकरच शबरीमला मंदिरात प्रवेश करणार

News Desk

नोटबंदीमुळे कष्टकरी उद्धवस्त: राहुल गांधी

News Desk

राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती

News Desk