HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरुन धनगर समाज आक्रमक, लवकर निर्णय घ्या अन्यथा संघर्ष अटळ!

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण पेटले आहे.अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. दरम्यान आरक्षणाच्या याच मागणीवरुन धनगर समाजही आत आक्रमक झाला आहे. आमदार आणि धनगर समाजाचे नेते यांनी आरक्षण मिळाले नाही तर राज्य सरकार आणि धनगर समाजातील संघर्ष अटळ आहे असा इशाराच दिला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले आहे.तसेच, एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलत असताना त्यांनी ठाकरे सरकारला इशाराही दिला आहे.

“धनगर समाजाची ही जुनी मागणी असून नव्याने मागणी करण्यात आलेली नाही. धनगर समाज गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करत असून रस्त्यावर उतरतोय, जेलमध्ये जातोय. पण तरीही आमची मागणी काही पूर्ण झालेली नाही. आमच्या मुलांच्या हातात एसटीचा दाखला द्या हीच आमची सरकारकडे मागणी आहे. ते कसं करायचं यासाठी विधी तज्ञांशी चर्चा करा आणि आमचा मार्ग मोकळा करा. पण सरकार यावर कोणतीही चर्चा करताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे”.

“नोव्हेंबर २०१९ मध्ये हे सरकार आले आणि आता सप्टेंबर महिना संपत आला आहे. पण धनगर आरक्षणावर एकही बैठक आजवर झालेली नाही. कोर्टात केस सुरु आहे तिथे एखादा चांगला वकील देणं वैगेरे असेही काही प्रयत्न झालेले नाहीत. लोकांच्या भावना तीव्र आहेत. करोनामुळे मला अधिवेशनात जाता आलं नाही. दुर्दैवाने तिथे हा प्रश्न मांडू शकलो नाही. तिथंही मी आंदोलनाची तयारी केली होती,” अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली. सरकारने चर्चा करुन काही दिवसांत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार संभाजीराजेंचा १० ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही!

News Desk

शरद पवारांचं राजकीय गणित असू शकतं, खडसेंच्या प्रवेशावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk

आमदार दानवेंची बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण, औरंगाबादेत तक्रार दाखल

News Desk