HW News Marathi
महाराष्ट्र

कृष्णकुंजच्या राजदरबारी येऊन समस्या तात्काळ सोडवल्या जातात, मावळवासियांकडून राज ठाकरेंचे आभार

मुंबई | काही दिवसांपूर्वी पुण्यातील सोमाटणे टोल स्थानिकांसाठी बंद करावा ही मागणी घेऊन मावळवासियांनी कृष्णकुंज गाठलं होतं, फक्त दीड किलोमीटर अंतर २ टोलनाके असल्याने स्थानिकांनी या टोलवसुलीविरोधात मोर्चा उघडला होता, याबाबत मावळवासियांसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले होते, टोलवसुलीविरोधात नागरिकांकडून तीव्र आंदोलन होणार होते, मात्र तत्पूर्वी या लोकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती.

हे टोलनाके बंद करावेत यासाठी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती परंतु, राज ठाकरेंच्या भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली लागला आहे, त्यामुळे या सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा भेट घेऊन राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. अनेक दिवस प्रलंबित असलेला प्रश्न खुद्द राज ठाकरेंनी एकाच फोनवर सोडवल्याने मावळवासियांना आनंद झाला होता, त्यांनी पुण्याचे मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे आणि नेते बाळा नांदगावकर यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले, त्याचसोबत कृष्णकुंजच्या राजदरबारी येऊन समस्या तात्काळ सोडवल्या जातात, निर्णय झटपट लागतात असं कौतुकही या शिष्टमंडळातील सदस्य मिलिंद अच्युत यांनी केले.

लोणावळ्यातील वर्सोली आणि सोमटणे-तळेगाव टोल नाक्यांवर मावळवासियांकडून टोल घेण्यात येणार नाही, त्याचा फायदा MH 14 नंबरच्या गाड्या असलेल्यांना होणार आहे. मागील भेटीवेळी या सर्वपक्षीय नेत्यांनी राज ठाकरेंकडे आपलं गाऱ्हाणं मांडले होते, त्यानंतर भेटीतच राज ठाकरेंनी IRB चे अधिकारी विरेंद्र म्हैसकर यांना फोन लावत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली, म्हैसकर यांनी समस्या लवकरात लवकर सोडवतो असं राज ठाकरेंना सांगितले, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतो असं आश्वासन राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला दिलं होतं, त्यानंतर काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गडचिरोलीत भूसुरुंगाच्या स्फोटात १५ जवान शहीद झाल्याची भीती

News Desk

बघा काही मिळतं का तुमचं वजन वापरून, आव्हाडांचा फडणवीसांना सणसणीत टोला

News Desk

भंडारा – मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना तात्काळ दिले चौकशीचे आदेश

News Desk