HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

मुंबई | राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पाडुरंग फुंडकर यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ६७ वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे गुरुवारी निधन झाले आहे. पहाटे सुमारे ४.३५ च्या दरम्यान फुंडकर यांची प्राण ज्योत मालवली. त्यांनी सोमय्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून फुंडकर हे आजारी होते, ते लवकर बरे होतील असे सर्वांना वाटत असताना त्यांच्या निधनाची आलेली बातमी सर्वांसाठी धक्कादायक ठरली.

या वृत्ताने आपल्याला मोठा धक्का बसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. पांडुरंग फुंडकर पक्षामध्ये भाऊसाहेब या नावाने परिचित होते. पांडुरंग फुंडकर यांनी तीन वेळा अकोला मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले होते. शांत, संयत व्यक्तिमत्व हे पांडुरंग फुंडकरांचे वैशिष्ट्य होते.

ही बातमी अत्यंत धक्कादायक असल्याचं राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप राज्यात उभी करण्यात फुंडकर यांचे मोठे योगदान असलयाचेही ते म्हणालेत.

एका चांगल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकला असल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. फुंडकर यांना शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत आदर होता, आणि त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण होती असंही अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दानवेंच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मदतीला पवारांचा हात

Adil

“मी पक्ष सोडला म्हणूनच थोरातांना प्रदेशाध्यक्षपद, नाहीतर त्यांचे कर्तृत्व काय ?”

News Desk

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थोपाटली शिवसैनिकांची पाठ!

News Desk
Uncategorized

पालघरमधील निवडणुकीतील गोंधळा विरोधात जनहित याचिका दाखल

News Desk

पुणे : पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणूक नुकतीच पार पडली आहे. निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडणे या गोंधळामुळे मतदानाला विलंब झाला. या सर्व गोंधळाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे कारण सांगून पुण्यातील मुक्त पत्रकार राजेंद्र सोनार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली.

सोनार यांनी न्यायदंडाधिकारी एम. डी. मेश्राम यांच्या न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. लोकसभा पोट निवडणुकीत झालेला गोंधळ हा समाजातील शांतता नष्ट होऊन अशांतता निर्माण होऊ शकते या सर्व कारणामुळे राजेंद्र सोनार यांनी ही याचिका दाखल केली. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार भा.द.वि. कलमा १७१ अंतर्गत ही याचिका दाखल केली आहे.

Related posts

“भगवान आणि गाय या दोघांना सोडले तर केंद्र सरकारने सर्वांवर GST लावला,” सुप्रिया सुळेंचा टोला

Aprna

आज मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी होणार

swarit

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक

News Desk