HW News Marathi
महाराष्ट्र

वसई-विरार महापालिका क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य !

वसई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार देशातील वाहतूक, रेल्वे सेवा आणि राज्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवाठ्यासाठी वाहतूक सुरू आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य पुरवले जाणार असल्याची घोषणा बहुजन विकासा आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.

हितेंद्र ठाकूर म्हणाले की, “सध्याच्या काळात नागरिकांना दोन घास मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा व्हायला हवा. आमच्या भागातील अनेकांचे पोट त्यांच्या हातावर आहे. अनेक उद्योगधंदे ठप्प असल्याने नागरिकांच्या हाताशी दोन पैसेही नाहीत. अशा सर्वच गरजुंना मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” या योजनेसाठी खूप खर्च होईल, हे आम्हाला मान्य आहे. पण सध्या नागरिकांच्या जीवापेक्षा मौल्यवान दुसरे काहीच असू शकत नाही. त्यामुळे हा सगळा खर्च आम्हीच करणार आहोत, असेही हितेंद्र ठाकूर यावेळी म्हणाले. लोकांना दोन वेळेचे अन्न मिळणे ही सध्याची प्राथमिकता आहे. ते उपलब्ध करून देणे हे आमदार म्हणून आमचे कर्तव्य आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्या दृष्टीनेच प्रयत्न करत आहोत, असे क्षितीज ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

महापालिका इतर अनेक गोष्टी करत आहे. त्यांच्यावर जास्त बोजा टाकणे योग्य नाही. त्यामुळे अन्नधान्याचा निकालात काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी शक्य झाल्यास त्यांना हे धान्य घरपोच उपलब्ध करून देता येईल, अशी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची सुरक्षा पणाला न लावता कशी मदत घेता येईल, याचाही विचार चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोगजंतुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी साबणाने वेळोवेळी हात धुण्याची सवय आवश्यक

swarit

राज्यातील कॉलेज दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती!

News Desk

पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने चाललंय त्याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल! 

News Desk