HW News Marathi
महाराष्ट्र

“केम छो वरळी…” संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!

मुंबई | मुंबईत काल (२२ सप्टेंबर) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, नवी मुंबईसह उपनगरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजही मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. पावसाने मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. दक्षिण मुंबईतील वरळीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र असून अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरले आहे. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे हाल झाले आहेत. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘केम छो वरळी…’ असा खोचक सवाल करत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओतून, पावसाचं पाणी घरात शिरल्याने किती भयानक परिस्थिती उद्भवली आहे, याचा अंदाज येतो आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालन्यात १ कोरोना पॉझिटीव्ह, दादरच्या पोलिस स्टेशनमधील हा कर्मचारी आहे

swarit

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींनी जाहीर माफी मागावी! – नाना पटोले

Aprna

मविआ सरकार आल्यापासून महाराष्ट्राला पणवती, दहीहंडीवरुन मनसेचे अविनाश जाधव आक्रमक!

News Desk