HW News Marathi
महाराष्ट्र

कंगना प्रकरण हे शिवसेनेचंच षडयंत्र, मनसेचा  सेनेवर गंभीर आरोप

मुंबई | सध्या बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण तापले आहे. अशात आता मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.सद्यपरिस्थितीवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनाच कंगना प्रकरण जाणीवपूर्वक वाढवत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. त्यांनी ट्विटरवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, आरोग्यचे प्रश्न, मंदिर प्रवेश, बेरोजगारी, मुख्यमंत्री घरीच बसून काम करत असल्याने जनतेत नाराजीचे वातावरण आहे. या सगळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी शिवसेना कंगना प्रकरण मोठं करत आहे, हे शिवसेनेच षडयंत्र आहे, असे देशपांडे यांनी म्हटले.

 

एरवी कंगनाच्या वक्तव्याला पाच पैशांचीही किंमत दिली जात नाही. अशावेळी तिच्या जाळ्यात अडकण्याएवढी शिवसेना निर्बुद्ध नाही. एका इंग्रजी आणि हिंदी वृत्तवाहिनीचा संपादक शिवसेनेचे वाभाडे काढत असताना गप्प असणाऱ्या शिवसेनेचा आत्ताच उद्रेक का झाला?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. कंगनाकडून सातत्याने सुरु असलेल्या या टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ९ सप्टेंबरला कंगना राणावत मुंबईत येणार आहे. त्यावेळी कंगनाला शिवसेना स्टाईल इंगा दाखवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे. त्यामुळे आता ९ तारखेला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यावरण आणि पर्यटन खाते मिळाल्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले…

News Desk

‘हिंदुस्थानी भाऊ’च्या पोलीस कोठडीत आणखी एक दिवसाची कोठडी वाढ

Aprna

आमचा सिनेमा सुदैवाने बरा चालला आहे!

swarit