HW News Marathi
महाराष्ट्र

ज्यांनी पेपर फोडला ते फुटले नाहीत म्हणून…!

मुंबई | ज्यांनी पेपर फोडला ते फुटले नाहीत, म्हणून सारखे पेपर फुटतात. ज्या प्रकरचा शासन म्हणून एक वचक असायला पाहिजे. तो वचक राहल नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. राज ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आले असून आज (१४ डिसेंबर) त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षण, पेपर फुटी अनेक विषयावर बोलले आहेत.

पेपर फुटीसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचरल्यावर राज ठाकरे म्हणाले, “हे काय पहिल्यांदा होतंय असं नाही, असं काही नाही की पेपर फुटला तो पहिल्यांदा फुटला आहे. इतक्या वर्षे अनेकदा फुटला. पण ज्यांनी फोडला ते फुटले नाहीत अजून, म्हणून सारखे पेपर फुटतात. ज्याप्रकराचा शासन म्हणून एक वचक असायला पाहिजे, तो वचक राहत नाही मग.” राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणावरून राज्यात सध्या गोंधळ सुरू आहे. हा गोंधळ निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच असल्याचा थेट आरोप राज ठाकेंनी सरकारवर केला आहे.

आपल्या देशात निवडणुका येतच असतात

“गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे बाहेर पडता आले नाही. आता बाहेर पडलो, आपल्या देशात निवडणुका या येतच असतात. म्हणून मी निवडणुसीसाठी बाहेर पडलो, असे तुम्ही प्रत्येकवेळी बोलू शकत नाही. आता तर तारखेनुसार फेब्रुवारी माहिन्यात निवडणुका होतील असे मला वाटत नाही. औरंगबादची निवडणूक कोरोनामुळे वर्षभर पुढे ढकलण्यात आली. ज्या निवडणुका आहेत. त्या होणार का यांची खात्री नाही की त्या होतील, की या निवडणूक अजून सहा-आठ महिने पुढे जातील,” असे राज ठाकरे म्हणाले.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये अनधिकृतरित्या झालेल्या वृक्षतोडीसंदर्भात गुन्हा दाखल! –  एकनाथ शिंदे

Aprna

फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलेंकडून रश्मी शुक्ला यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा

Aprna

भाजपच्या 12 महिलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र जसंच्या तसं!

News Desk