HW News Marathi
महाराष्ट्र

३६५ दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी !

औरंगाबाद | छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यांची आज (१२ मार्च) तिथीनुसार जयंती आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती सोहळ्यासाठी औरंगाबादमध्ये हजेरील लावली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “३६५ दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

“आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये जे तिथीनुसार साजरी करायची का याबद्दल सांगायचे झाले तर, आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे तो एका सणाप्रमाणेच साजरा झाला पाहिजे,” असे ठाकरे म्हणाले.

आधीच या देशात इतकी रोगराई आहे | राज ठाकरे

कोरोना व्हायरसमुळे शिवजयंती कशी साजरी करायची, अशा प्रश्न सर्वांनी मला विचारला. तेव्हा मी म्हटले की, “आधीच या देशात इतकी रोगराई आहे, त्यात आणखी एक वाढ, त्याने काय फरक पडतो, तुम्ही काळजी घेतली पाहिजे, याबद्दल काही प्रश्न आणि वाद नाही,” असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. मनसेने शिवजयंतीचा सण धूमधडाक्यात साजरा केला असून, औरंगाबादेतल्या मनसेच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंनीही उपस्थिती दर्शवली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकर मंजुरी द्यावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

Aprna

अमित शहांनी बंद दरवाजाआड वचन दिलं होतं, हे खोटं कोण बोलतंय हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगले! – अतुल भातखळकर

Aprna

आर्यन खानला आजही मिळाला नाही जामीन; गुरुवारी होणार जामिनावर सुनावणी

News Desk