HW News Marathi
महाराष्ट्र

‘…आता आर. आर. पाटील असते तर’, मनसेची मनसुख हिरेन प्रकरणावर प्रतिक्रिया

मुंबई | सध्या विधानसभेत गाजत असलेल्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरुन आता ‘मनसे’नेही राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या चुका लक्षात आणणं हे विरोधकांचे काम आहे. आर. आर. पाटील पदावर असताना आमचं म्हणणं योग्य असेल तर संबंधितांवर त्वरित कारवाई करायचे, असा अप्रत्यक्ष टोला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला आहे.ते आज (१० मार्च) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी सचिन वाझे यांनी राजीनामा देऊन सत्याचा स्वीकार करायला पाहिजे, असा सल्ला दिला. या कारणावरून सभागृहाचे कामकाज बंद पाडणे योग्य नाही. विधानसभेत केवळ मुकेश अंबानी आणि सचिन वाझे यांच्यावर चर्चा होते. लोकहिताच्या प्रश्नांवर काम होत नाही, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

सचिन वाझे यांनी सत्याचा स्विकार करून आपला राजिनामा द्यायला हवा, तसेच सभागृहाचे कामकाज अशा कामावरून बंद पाडणं योग्य नसून विधानसभेत केवळ अंबानी आणि सचिन वाझे प्रकरणावरच चर्चा होते. लोकहिताच्या प्रश्नांवर कसलही काम होत नाही, अशी टीकाही नांदगावकर यांनी यावेळेस केली आहे.

दरम्यान मनुसख हिरेन प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली आहे. मात्र सरकारला घेरण्यासाठी देशमुख यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग प्रस्तावही आता सभागृहात दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर, खडसे-मुंडेंबाबत पक्षाचा हा निर्णय

News Desk

पुण्यात कोरोना बाधितांची संख्या २०४ वर, तर  मृतांचा आकडा २० वर पोहोचला 

News Desk

आमिर खान मतदान केलाच नाही

News Desk