HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी मनसेचा उद्या ठाण्यात मोर्चा

ठाणे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या (१७ मे) ठाण्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. मनसेचे पालघर आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काल (१५ मे) पत्रकार परिषद आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहीती दिली आहे. मनसे कडून काढण्यात येणाऱ्या या मोर्चामध्ये राज्यातून जवळपास पाच हजार शेतकरी उपस्थित राहतील असा विश्वास अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

ठाण्यामध्ये आंबा स्टॉल लावण्यासाठी तेथील भाजपच्या नगरसेवकाने एका शेतकऱ्याला २० हजार रुपयांची रक्कम मागितली. मात्र तो शेतकरी तेव्हढी रक्कम देऊ शकला नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली. परंतु महापालिकेकडे या स्टॉलसाठी परवानगी मागितली असता ती नकारण्याचे कुठलेच कारण त्यांच्याकडे नाही, अशी माहीती अविनाश जाधव यांनी दिली. यासाठीच शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे.

८ ते १० हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १०० स्टॉल उपलब्ध करुन द्यावे. तसेच ज्याने शेतकऱ्यांकडून पैसे मागितले त्या भाजपच्या नगरसेवकावर कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वत:च्या मुलाला मंत्री केलं,आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय? भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

शिवसनेने सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला, श्वेता महालेंची टीका

News Desk

घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे – नवनीत राणा 

News Desk